गोष्ट आहे, 5 मित्रांची. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या, विभिन्न संस्कृती, विभिन्न वारसा आणि विभिन्न पार्श्वभूमी लाभलेल्या. घरात आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा.
माझ विचारचक्र सुरु होत, तोवर कानावर आवाज एक आवाज पडला... ण्यॉव~...ण्यॉव~...ण्यॉव..ण्यॉव~...ण्यॉव.... पांढऱ्या रंगाची, लाल-निळ्या टोपीची एक गाडी, धुळीचा मोठाला भपका उडवत, विजेच्या वेगान गेली.
"एखादयाची संपत्ती त्याच्या पर्स मध्ये किती पैसे आहेत यावर अवलंबून नसते. कारण, कितीही भरलेली पर्स लगेच रिकामी पण होते, जर तिला पुन्हा भरण्यासाठी कोणता प्रवाह ठेवला नसेल, तर..."
आजकाल ऊन जरा जास्तच वाढलय. १२ चा ठोका सोडाच, १०-११ झाले तरी लाही लाही होते अंगाची. फ्रिज मध्ये भाज्यां पेक्षा कोल्ड्रिंक्स, ice-cream, सरबत, पन्ह, कोकम यांच्या बाटल्याच जास्त जागा काबीज करतात.
प्रेम हे करायचं नसतं, ते आपोआप होत असत... पण, आयुष्याचा गाडा ओढता ओढता, त्यात आपण इतके तल्लीन झालोय, की, कधी काळी, अलगत अन् निरागस पणे झालेलं ते प्रेम आज आपणच काळाआड लोटलय.