"एखादयाची संपत्ती त्याच्या पर्स मध्ये किती पैसे आहेत यावर अवलंबून नसते. कारण, कितीही भरलेली पर्स लगेच रिकामी पण होते, जर तिला पुन्हा भरण्यासाठी कोणता प्रवाह ठेवला नसेल, तर..."
- जॉर्ज एस क्लासन, आपल्या 'The Richest Man in Babylon' या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत अचूकपणे हे सारं सांगतात.
बॅबिलोन, प्राचीन बॅबिलोन साम्राज्याचे राजधानी शहर... अत्यंत श्रीमंत शहर. त्याचे अवशेष सध्याच्या इराकमध्ये सापडतात. हे पुस्तक म्हणजे, बॅबिलोनमधील सर्वात श्रीमंत माणूस श्रीमंत कसा होतो, स्वतःकडे पैसा कसा आकर्षित आणि त्यामागील रहस्य काय... या सगळ्याच उत्तम असं गाठोडं आहे.
टीपः खाली नमूद केलेले सर्व विचार णजे पुस्तकाचा bird eye view आहे. आपण अशा लोकांपैकी असाल, ज्यांना ज्यांना सारांश स्वरूपात पुस्तकाचा पेच माहित करून घेणं आवडत, तर हा ब्लॉग म्हणजे तुमचं इच्छित स्थळ, बर का... 🙂
लेखक म्हणतात, संपत्ती हि झाडासारखी आहे, जी एका लहान बीजापासूनच वाढते. आपण जतन केलेली छोटी रक्कम म्हणजेच पेरलेल पहिलं बीज, ज्यापासून आपल हे संपत्तीच झाड उगवणार आहे. जितक्या लवकर तुम्ही हे बी पेराल, तितक्या लवकर हे झाड वाढेल. जितकं प्रेमाने त्याच पालनपोषण कराल तितकंच प्रेमाने ते झाडं त्याच्या सावलीच समाधान देईल.
सल्ला देणारे खुप जण भेटतात, आपले मित्र, सहकारी, कुटुंब.. काही जण वयाने लहान तर काही वडील मंडळी. हेच वय आणि संबंधित सल्ला यांचे मुल्यांकन करताना लेखक म्हणतात, तारुण्यातील विचार आकाशातील उल्कासारखे दिसतात, जे बर्याचदा आकाश तेजस्वी करतात. परंतु वयानुसार आलेलं शहाणपण हे स्थिर नक्षत्रांसारखे आहे, जे इतके स्थिरपणे चमकतात की नाविक त्यांचा मागोवा घेत आपल्या मार्गावर जाण्यासाठी त्यांवर बिन्धास्त अवलंबून राहतो. एका वाक्यात या पुस्तकाच वर्णन करायच झाल्यास, मी एवढच म्हणेन, 'जुन्या शहाणपणाचा एक निश्चित तारा, म्हणजे हे पुस्तक'.
आयुष्यात प्रत्येकजण कधी ना कधी चिंताग्रस्त असतो. विशेषतः सद्य स्थितितल्या महामारी सारख्या परिस्थितीमुळे. आपल्यातले बरेच जण आज बेरोजगार आहेत, काही कमी पगारावर कामं करतायत. पण यांत रडत न बसता मार्ग काढला पाहिजे. संकटांना संधींमध्ये रूपांतरित केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, परिस्थितीला आणि दुर्दैवाला दोष देण्याऐवजी, त्याला समोर जायची तयारी करण आवश्यक आहे. 'संधी ही एक गर्विष्ठ देवी आहे, जी वेळ घालवते ते फक्त तयारीत असलेल्यांसोबतच'. जे काही थोडंफार आपण कमावतो, त्यातील एक भाग नेहमी स्वतःच स्वतःसाठी ठेवला पाहिजे.
पण हे सगळं कस साधायच? तर सोप्पं आहे.. फक्त हे ७ उपाय:
१. बचत - जर आपण १० नाणी कमवत असाल तर खर्चायचित फक्त ९.
२. नियंत्रित खर्च - खर्चाचे बजेटच असे बसवायचे की, आपल्या गरजा / आनंद इत्यादी साठी मोजावा लागणारा पैसा हा नऊ दशांश (९/१०) पेक्षा जास्त नसावा.
३. पैसा आणि त्याचा गुणाकार - ढीगभर पैशांनी पर्सचे सौंदर्य वाढविण्यापेक्शा, पैशांना तुमचा नोकर बनवा आणि उत्पन्न वाढवा.
४. तोट्यापासून खजिना वाचवा - सुरक्षित ठिकाणी, हवं त्या वेळी काढता येईल, अशा ठिकाणीच गुंतवणूक करा, तज्ज्ञ लोकांशी सल्लामसलत करा. त्यांच्या ज्ञानाला, तुमच्या सुरक्षित गुंतवणूकीचे रक्षक बनवा.
५. फायदेशीर गुंतवणूक करा - स्वतःच्या घरासारखच, स्वतःच्या खजिन्याचा बॉस बना. व्यवस्थापना साठी आपला खजिना दुसर्यास देऊ नका.
६. भविष्यातील उत्पन्नाची जोडणा - वाढत वय, आरोग्य आणि कुटुंब, यांच्या आगाऊ गरजा आधीच ओळखा आणि त्यावर कार्य करण्यास सुरवात करा, आताच.
७. कमविण्याची क्षमता वाढवा - अभ्यास आणि शहाणे होण्यासाठी अधिक कौशल्यपूर्ण, कृतीशील आणि आदरणीय होण्यासाठी स्वतःला तयार करा.
बरेच लोक नेहमी तक्रार करतात की ते दुर्दैवी आहेत. भाग्य हे त्यांच्या साठी नाहीच, वगैरे वगैरे. पण हे बिलकुल सत्य नाही. भाग्य किंवा नशीब हे त्याच्याच पदरात पडत जो सतत काही ना काही करत राहतो. कधी कधी लोकांना मदत करतो, प्रियजनांची काळजी घेतो, परंतु लक्षात असू द्या, मदत करणे म्हणजे त्या मित्राचे ओझे आपल्या खांद्यावर लादने न्हवे. मोठ्या संकटापेक्शा थोडी सावधगिरी कधीही चांगलीच.
प्रत्येकजण भुकेला आहे. कोणी अन्नासाठी, कोणी मनःशांतीसाठी तर कोणी संपत्तीसाठी. यात वावग असं काही नाही. कारण, भुकेल्या पोटीच मन स्पष्ट होत. काय करावं अन काय नको हे बर उमगत. भूक शमविण्यासाठी अधिक कठोरपणे कार्य करण्यास प्रवृत्त करत. करोडपती सारखं जगण्यासाठी गुलामासारखे किंवा दरिद्री सारखं काम करू नका. स्वतःस प्रश्न विचारा ... 'मी गुलामाचा आत्मा आहे की मुक्त माणसाचा?'
जर माझ्याकडे गुलामाचा आत्मा असेल तर मी माझ्या साऱ्या इच्छा माराव्यात, सोडून द्याव्यात, आयुष्य नामक वाळवंटात मरून पडाव, गुलामगिरीच्या त्रासाला कंटाळून पळून जाव..... परंतु जर मला मुक्त माणसाचा आत्मा मिळाला असेल, तर मात्र मी माझ्या नशिबाचा रस्ता बदलेन, लोकांचा विश्वास परत मिळवेन, ज्यांनी माझ्यावर खरोखर प्रेम केले त्यांच्यासाठी आनंदीपणा आणेन आणि आयुष्यात शांती आणि समाधान कमवेन.
शेवटी, प्रत्येकाला विकसित व्हायच असत, निरोगी आणि श्रीमंत जीवन जगायच असत, तेजस्वी प्रकाश आयुष्यात आणायचा असतो. हे सगळं करण्यासाठी लागणारं सगळंच आपल्या आसपास असत, फक्त गरज असते ती म्हणजे, निर्धार. कारण, 'जिथे जिद्द तिथेच मार्ग.'
© आराधना खोत